- DESIGN: 2.5D straight front screen + 2D back cover, creating smooth lines and an elegant outlook. The entire phone has a…
- DISPLAY : 17.02cm (6.7″Inch) AMOLED Display and Ultra-narrow bezel with Screen-to-body ratio: 93.4% .FHD+ Resolution wit…
- CAMERA : 32MP IMX615 Sony sensor Front Selfie Camera| Triple Rear Camera 64MP Main Camera + 8MP Sony IMX355 ultra wide a…
जालना : जिल्ह्यातील पाचही मतदारसंघातून महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाला. भाजपचे तीन आणि शिवसेनेचे दोन अशा पाचही जगावर महायुतीने विजय मिळवला. परंतु एकाही आमदाराला साधे राज्य मंत्रिपदही मिळू शकले नाही. त्यामुळे जालन्याचे पालकमंत्री हे दुसऱ्या जिल्ह्याचे असणार आहे. परंतु, जालन्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेला की भाजपला मिळणार याची उत्सुकता दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना लागली आहे. तसेच ऐनवेळी अजित पवार यात उडी मारतात की काय अशीही शक्यता वाटू लागली आहे.
सलग 5 वेळा आमदार राहिलेले राष्ट्रवादीचे राजेश टोपे या दिग्गज नेत्याचा हिकमत उढाण यांनी पराभव केला. तर जालना शहराची सत्ता सांभाळूनही कॉंग्रेसचे कैलास गोरंट्याल पराभूत झाले. परतूर मतदारसंघात महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे आसाराम बोराडे आणि कॉंग्रेसचे सुरेशकुमार जेथलिया या दोघांच्या भांडणात भाजपचे बबनराव लोणीकर हे निवडून आले. बदनापूर आणि भोकरदन मतदारसंघात भाजपचे नारायण कुचे आणि संतोष दानवे यांनी आपला गड राखला. महायुतीला एवढे मोठे यश मिळवूनही एकाही नेत्याला मंत्रिपद मिळू शकले नाही.
भाजपात असलेल्या लोणीकर आणि दानवे गटाच्या राजकारणामुळे ‘ना मला ना तुला घाल कुत्र्याला’ अशी गत जालना जिल्ह्याची झाली आहे. कारण लोणीकर यांनी राज्यात तर दानवे यांनी केंद्रीय मंत्रिपद भूषविले आहे. या दोघांपैकी एका गटाला मंत्रिपद मिळाले असते तर जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा दुफळी तयार झाली असती. म्हणून भाजपच्या एकही आमदाराला मंत्रिपद देण्यात आले नसू शकते. दुसरे कारण हेही मानले जात आहे कि भाजपातील अनेक निष्ठावंत नेत्याला आतापर्यंत मंत्रिपद किंवा न्याय देता आला नाही म्हणून मंत्रिमंडळात नवीन चेहरे घेण्यात आले आहे.
अतुल सावेंना खोतकरांचा विरोध
मागच्या काळात भाजपचे अतुल सावे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले. परंतु, त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला. विकास कामांच्या टक्केवारीवरून त्यांच्यावर आरोप झाले. तसेच विकासकामे वाटप करताना भेदभाव केल्याचाही आरोप झाला. त्यामुळे शिंदे गटाकडून त्यांना विरोध आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तशी मागणी पंडितराव भुतेकरसह अनेक कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे अतुल सावे हे पालकमंत्री होणार नाहीत, अशी शक्यता आहे.
भाजपाचे ३ आमदार जिल्ह्यात आहे. त्यात महानगरपालिकेची निवडणूक आता होऊ घातली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री पद भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे. भाजपकडून राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचा विचार होऊ शकतो. त्यांच्या रूपाने जिल्ह्याला पहिल्या महिला पालकमंत्री मिळतील. तसेच फडणवीस यांचे जवळचे मंत्री आकाश फुंडकर यांनाही संधी मिळू शकते.
हेही वाचा https://gaongadaa.com/santosh-deshmukh-murder-case-who-is-sandhya-sonawane/
- Illuminate the darkest environments with the Pick Ur Needs Dual Mode Full LED Rechargeable Torch, designed for power, pr…
- Powered by a 2000mAh maintenance-free rechargeable battery, this LED torch requires no external batteries—simply plug in…
- Crafted with a high-quality aluminum body, the torch is lightweight, durable, and water-resistant, making it suitable fo…