मुंबई: लाडक्या बहीणींसाठी महत्वाची उपडेट आलेली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही तक्रारी आणि अनियमितता आढळल्याने महाराष्ट्र शासनाने अर्जांची पुनर्पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला आणि बालविकास विभागाने घरोघरी जाऊन लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची व दाव्यांची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
तपासणीदरम्यान काय होणार?
लाभार्थ्यांच्या घरी जाऊन मतदार यादी, कर नोंदी, आधार डेटाबेस आदींच्या आधारे पात्रतेची पडताळणी केली जाणार आहे. खोटे दावे करणाऱ्या लाभार्थ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाईल. तसेच, चुकीने मिळालेले लाभ परत करण्याचा पर्यायही दिला जाणार आहे.
अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत बदल
लाडकी बहीण योजनेचे अर्ज आता केवळ अंगणवाडी सेविकांकडूनच स्वीकारले जातील. यापूर्वी अर्ज स्वीकारण्याचा अधिकार असलेल्या १० प्राधिकृत व्यक्तींचे अधिकार रद्द करण्यात आले आहेत.
फसवणुकीच्या तक्रारी वाढल्या
महिला आणि बालविकास विभागाला या योजनेसंदर्भात २०० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने सुमारे २.५ लाख अर्जांची पुनर्पडताळणी सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन महिने लागण्याची शक्यता आहे.
लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना
लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी आपल्या बँक खात्यांचे आधार सीडिंग तातडीने करून घ्यावे, जेणेकरून अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यात वेळेत जमा होईल.
सरकारचा उद्देश
या पुनर्पडताळणी प्रक्रियेचा उद्देश म्हणजे लाभ फक्त पात्र आणि गरजू महिलांनाच मिळावा, अनियमितता थांबवावी आणि योजनेत पारदर्शकता आणावी.
हेही वाचा – धनंजय मुंडे यांच राजीनाम्या विषयी मोठं विधान