बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
“संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रत्येक आरोपीवर कडक कारवाई केली जाईल. कुणालाही अशा प्रकारची हिंसा करण्याचा अधिकार नाही,” असे फडणवीस म्हणाले. त्यांनी गुंडगिरीवर आळा घालण्याची गरज व्यक्त केली. “गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही. खंडणी मागणाऱ्यांवर कडक कारवाई होईल,” असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, तपासाला गती देण्यात आल्याने कराडला आत्मसमर्पण करावे लागले. “कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे फडणवीस म्हणाले.
- Display: 6.67″ FHD+ AMOLED (1080×2400) Ultra-narrow bezels Display with 120Hz Refresh rate; 2100nits peak brightness; Co…
- Processor:Mediatek Dimensity 7025-Ultra 6nm Octa-core 5G processor for high performance ; Up to 2.5GHz ; Upto 12GB RAM i…
- Camera: 50MP Sony LYT-600 AI Triple Camera with 8MP Ultra Wide sensor and 2MP Macro camera| 20MP Front camera
ते म्हणाले, “मी धनंजय देशमुख यांच्याशी बोललो आहे. दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही. जोपर्यंत तो फासावर लटकत नाही, तोपर्यंत पोलिस कारवाई करतील.”
संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.