जालना: जिल्हा रेशीम कार्यालय, जालना यांच्या वतीने “महा रेशीम अभियान – २०२५” अंतर्गत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजता ढेबे वस्ती वडीकाळ्या येथे पार पडणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाधिकारी मा. डॉ. श्रीकृष्ण पांचाळ सर उपस्थित असतील. तसेच पुढील मान्यवर हे देखील कार्यक्रमात सहभागी होतील:

महेंद्रढवळे, सहाय्यक संचालक श्री. बालासाहेब गंडे, श्री. अजय मोहिते, श्री. पुलिकीत सिंह, श्री. विजय चव्हाण, श्री. उदयसिंह राजपूत, श्री. शरद जगताप, श्री. सुनील काळे, सौ. शिवनंदा भगवान ढेबे.

डॉ. श्रीहरी काळे यांनी सांगितले केले की, “रेशीम शेतीला चालना मिळावी आणि शेतकऱ्यांना तुती लागवडीसाठी प्रेरणा मिळावी” – या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तुती लागवडीमुळे शेळीपालन व कुक्कुटपालनासही चालना मिळते, ज्यामुळे शेतकरी आपले उत्पादन वाढवू शकतात.

शेतकरी व संबंधित सर्व गटांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन त्यांच्या उत्पादनात सुधारणा करण्याची संधी साधावी.

रेशीम शेतीचे फायदे (Silk Farming Benefits)

1. अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत – पारंपरिक शेतीसोबत अतिरिक्त कमाईसाठी उपयुक्त.

2. कमी जागेत जास्त उत्पादन – तुती लागवडीसाठी कमी जागा लागते आणि चांगले उत्पन्न मिळते.

3. सेंद्रिय शेतीला चालना – तुती पानांचा कोंबड्या, शेळ्या आणि गुरांसाठी चारा म्हणून उपयोग होतो.

4. निर्यातीची संधी – रेशीम धाग्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

5. जलद परतावा – इतर पिकांच्या तुलनेत कमी कालावधीत चांगला नफा मिळतो.

6. कमी खर्च, जास्त नफा – तुलनेने कमी भांडवलात सुरू करता येणारा व्यवसाय.

7. रोजगार निर्मिती – शेतकरी, महिला आणि बेरोजगार युवकांसाठी चांगली संधी.

एकूणच, रेशीम शेती हा कमी खर्चात अधिक नफा मिळवून देणारा पर्याय आहे.

Spread the love