मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदार यादीतील अनियमिततेवरून राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांनी टीका करताना राहुल गांधींना “दुसरे मुन्नाभाई एमबीबीएस” असे संबोधले. तर उद्धव ठाकरेंच्या बाबतीत ही मोठा खुलासा केला.
🔹 2019 सत्तासंघर्षावर मोठा गौप्यस्फोट
जयपूर डायलॉग कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी 2019 च्या राजकीय उलथापालथीवर मोठा खुलासा केला.
“लोकसभा निवडणुकीदरम्यान युती फायनल झाली होती. मात्र, एका रात्री उद्धव ठाकरे यांनी अचानक अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली. मी ही बाब अमित शहांच्या कानावर घातली, परंतु त्यांनी ती मागणी साफ नाकारली. त्यानंतर मी उद्धव ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती,” असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला.
🔹 राहुल गांधींना आत्मपरीक्षणाचा सल्ला
फडणवीस यांनी राहुल गांधींवरही जोरदार टीका केली.
➡️ “राहुल गांधी अर्बन नक्षलवादाला बळ देत आहेत. ते आमच्या लोकशाही संस्थांवर अविश्वास टाकून जनतेचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.”
त्यांनी यावेळी शेरोशायरीच्या माध्यमातून राहुल गांधींना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला –
📝 “ताउम्र गालिब हम यही भूल करते रहे,
धूल चेहरे पर थी और हम आइना साफ करते रहे…”
🔹 कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यावर भर
फडणवीस यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने विधानसभेसाठी कशी तयारी केली यावर भाष्य केले.
💡 “विरोधी पक्षाशी आपण लढू शकतो, हे कार्यकर्त्यांना सांगणे गरजेचे होते. भाजपला 2 कोटी 38 लाख मते मिळाली होती, तर महाविकास आघाडीला 2 कोटी 50 लाख मते मिळाली. त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला,” असे त्यांनी स्पष्ट केले.
🚀 #DevendraFadnavis #RahulGandhi #MaharashtraPolitics #BJP #ShivSena #Congress #MaharashtraElection2024, #DevendraFadnavis, #RahulGandhi, #BJPvsCongress, #ShivSenaBJP, #UddhavThackeray, #MaharashtraPolitics, #ElectionNews, #PoliticalDebate,
#BJP4Maharashtra, #CongressVsBJP, #LokSabhaElection2024, #ModiGovernment, #JaipurDialogue,