त्याला सोडणार नाही... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसत्याला सोडणार नाही... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात, तपासाच्या निष्पक्षतेबद्दल शंका उपस्थित झाल्यामुळे राज्य सरकारने आता जुनी विशेष तपास पथक (एसआयटी) बरखास्त करून नवीन एसआयटीची स्थापना केली आहे.

जुन्या एसआयटीमधून खालील अधिकाऱ्यांना वगळण्यात आले आहे:

• अनिल गुजर, पोलीस उपअधीक्षक

• विजयसिंग जोनवाल, सहायक पोलीस निरीक्षक

• महेश विघ्ने, पोलीस उपनिरीक्षक

• आनंद शंकर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक

• तुळशीराम जगताप, सहायक पोलीस उपनिरीक्षक

• मनोज वाघ, पोलीस हवालदार

• चंद्रकांत काळकुटे, पोलीस नाईक

• बाळासाहेब अहंकारे, पोलीस नाईक

• संतोष गित्ते, पोलीस शिपाई

आता नव्या एसआयटीमध्ये ६ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे, आणि उपमहानिरीक्षक बसवराज तेली हेच या पथकाचे प्रमुख राहतील.

नव्या एसआयटीमधील अधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

• श्रीमती किरण पाटील

• श्री सुभाष मुठे

• श्री अक्षयकुमार ठिकाणे

• श्रीमती शर्मिला साळुंखे

• श्रीमती दीपाली पवार

• श्री अनिल गुजर

या नव्या पथकाच्या स्थापनेमुळे तपास प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता येईल, अशी अपेक्षा आहे.

संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *