घनसावंगी : जालना जिल्ह्यातील बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांच्या पुढाकारातून घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे ११ व १२ फेब्रुवारी रोजी भव्य शंकरपाटचे आयोजन करण्यात आले आहे. रांजणी येथील रेल्वे स्टेशन रोड परिसरातील मैदानावर ही स्पर्धा होणार असून या बैलगाडा शर्यतीत महाराष्ट्रातील नावाजलेल्या बैलजोडी सहभागी होणार आहे.
महाराष्ट्रातील नावाजलेल्या सर्जा – राजाची जोडी या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने जालना जिल्ह्यातील बैलगाडा प्रेमींना पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यात शंकरपटाचा थरार पाहायला मिळणार आहे. 400 वर्षा पेक्षा अधिक काळाचा इतिहास असलेला ग्रामीण सांस्कृतीचे दर्शन घडवणारा ‘शंकरपट’ हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा पारंपारिक क्रीडा प्रकार आहे. शेतकऱ्यांच्या श्रमाचे प्रतिक असलेल्या सर्जा- राजाची शर्यत महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. जालना जिल्ह्यातील शेतकरी व बैलगाडा प्रेमींसाठी सतीश घाटगे यांनी या शर्यतीचे आयोजन केले आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा होत असलेल्या या शर्यतीचा बैल गाडा प्रेमी व शेतकऱ्यांनी आनंद घ्यावा, असे आवाहन श्रीमंत पोकळे, विजय वरखडे ,अफरोज तांबोली फारूक तांबोली, फारूक तांबोली, विष्णू चव्हाण, रंजित राठोड, अमीर कुरेशी बबलू तांबोली, शेख सलाम सलमान तांबोली, अतिक तांबोली, शेख सईद चीकीवाला, इरफान मौलाना , सलमान तांबोली, जीस्ताक सय्यद, मोसीन अली सह नियोजन समितीने केले आहे.
बक्षिसांची लयलूट
या शंकरपट स्पर्धेत आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले असून प्रथम विजेत्या बैलगाडा मालकाला सतीश घाटगे पाटील यांच्या तर्फे दुचाकी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला विजय वरखडे व विष्णू चव्हाण यांच्याकडून बक्षीस म्हणून स्कुटी भेट देण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धेत 5 हजारापासून ते 15 हजारापर्यत रोख बक्षिसेही विजेत्यांना मान्यवरांकडून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.