बीड: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा संभाव्य एन्काऊंटरबाबत चिंता व्यक्त केली आहे.

वडेट्टीवार यांनी असा दावा केला आहे की, “मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो.”

त्यांनी असेही आरोप केले आहेत की, कराड यांच्या पोलीस कोठडीत विशेष सुविधा पुरवल्या जात आहेत, ज्यामुळे तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. त्यांच्या मते, “पोलिस स्टेशनमध्ये बेड घेऊन गेले आहेत. हे कोणाचे लाड आहेत? वाल्मिक कराडचा लाड पुरवण्यासाठी, त्याला पोलीस कोठडीत असताना बेडवर झोपवण्यासाठी नेले आहेत का? याची चौकशी झाली पाहिजे.”

वडेट्टीवार यांनी सरकारला आवाहन केले आहे की, कराड यांची चौकशी बीड जिल्ह्याबाहेर नेऊन निष्पक्षपणे केली जावी, ज्यामुळे मोठ्या आरोपींपर्यंत पोहोचणे शक्य होईल. त्यांच्या म्हणण्यानुसार, “वाल्मिक कराड वर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का? करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे.”

संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे, आणि वडेट्टीवार यांच्या या विधानामुळे चर्चेला अधिक उधाण आले आहे.

हे ही वाचा

जालन्याचा पालकमंत्री कोण ?

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *